भारतातील ग्रामीण भागात देखील लहान मुलांना पोलिओची लस दिली जाण्यासाठी भारत सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये मिशन इंद्रधनुष सुरु केले आहे. या उपक्रमाचे ध्येय दोन वर्षापर्यंत आणि गर्भवती महिलांसाठी लसीकरण करणे असून, सरकारने या सर्व लसी नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. भारतात १९९५ मध्ये पोलिओच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.