क्रांतिकारक, हिंदुत्व, हिंदूराष्ट्र मांडणारे सावरकर समाजक्रांतिकारकही होते हे विसरता कामा नये, कारण सावरकरांना त्यांच्या आयुष्यातील रोमहर्षक घटनेपेक्षा त्यांचे सामाजकार्य महत्त्वाचे वाटायचे म्हणून सावरकर म्हणायचे,’’मी सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका.