लालबहादूर शास्त्री हे एक थोर स्वातंत्र्यसेनानी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. आपल्या बालवयात ते स्वातंत्र्य चळवळींमध्ये सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांच्या भाषणाने भारावून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेण्याचे ठरवले. या दरम्यानच त्यांचा भारतीय राजकारणाशी देखील संबंध आला होता. लालबहादूर शास्त्री हे अत्यंत मृदूभाषी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीसाठी ते ओळखले जात. जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून एकमताने. भारत-पाक युद्धनंतर रशियामध्ये झालेल्या ताश्कंद करारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.