सोशल मीडियावरून केली 'चलचित्र कंपनी' या नव्या प्रोडक्शन कंपनीची घोषणा
चित्रपट सृष्टीतील काही महत्वाच्या नावांपैकी क्षिती जोग आणि हेमंत ढोमे हे दाम्पत्य. त्या दोघांनी आता आपल्या टेलिव्हिजन क्षेत्रातील यशानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत आपली एक प्रोडक्शन कंपनी सुरु केली आहे. चलचित्र कंपनी असे त्यांच्या या नव्या प्रोजेक्टचे नाव असून सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतीच क्षितीने याविषयी घोषणा केली. त्याचबरोअबर या प्रोडक्शन कंपनीची निर्मिती असलेल्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला उद्यापासून सुरुवात होणारे. चित्रपटाविषयीची माहिती ते लवकरच उघड करणार असल्याचे देखील तिने या पोस्टमध्ये नमूद केले.
दामिनी सारखी लोकप्रिय मालिका तसेच ये रिश्ता क्या केहलता है, साराभाई यासारख्या मालिकांमधून तसेच संशय कल्लोळ आणि माई यांसारख्या चित्रपटांमधून घराघरात पोचलेली क्षिती जोग आणि तिचा आयुष्यातील जोडीदार आणि या कंपनीतील साथीदार म्हणजेच दिग्दर्शक आणि लेखक हेमंत ढोमे यांनी एकत्रितपणे या कंपनीची सुरुवात केली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat