मुंबई : रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खानापूर तालुक्यात मोरबे धरण तयार बांधण्यात आले आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही, त्यांना नियमानुसार जी मदत करायला पाहिजे ती मदत तातडीने करण्यात यावी असे आदेश मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.
मंत्रालयात मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर, राज्य पुर्नवसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी तसेच सिडकोचे अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.
या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत यासंदर्भात सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका यांनी गावकऱ्यांसोबत संयुक्त बैठक घ्यावी आणि या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, तसेच सिडकोच्या नियमाप्रमाणे जी साडेबारा टक्के मोबदला म्हणून जमीन देता येते, त्याचाही विचार करावा यासाठी धरणाच्या अतिधोक्याच्या पातळीच्या पुढे जर अतिरिक्त जमीन उपलब्ध असेल तर ती जमीन शेतकऱ्यांना परत देता येते का याचाही अभ्यास करावा आणि या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करावी असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
पेन टाकळी व होटगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat