नियुक्तीनंतर दैनिक 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना ते म्हणाले, "केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली अनेक जनहित योजनांची आणि लोकोपयोगी कामांची पायाभरणी गेल्या पाच वर्षांत झाली आहे. येत्या काळात राज्यासह देशपातळीवर त्याचा प्रभाव प्रसार सरकार आणि अन्य संस्था करणार आहेत." दरम्यान, येत्या अर्थसंकल्पातही केंद्र सरकार 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास'ही जिंकेल असे मत त्यांनी नोंदवले.
देशातील तळागाळातील जनतेपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यासाठी बांधणी कारण्यात आलेल्या या समिती मार्गदर्शक मंडळात भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आदी मान्यवरांचा सामावेश आहे. या कार्यकारणीवर आता देशपांडे यांचीही निवड झाली असून देश विदेश पातळीवर देशाच्या उत्थानासाठी ते काम करतील, असा विश्वास प्रचार प्रसार समितीचे राष्ट्रीय महामंत्री अंकित संचेती यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.