दरम्यान, आजारातून बाहेर पडण्यासाठी मला सावरकारांची मदत झाली असेही ते म्हणाले. 'सावरकरांनी अकरा वर्ष एका छोट्याश्या खोलीत काढली आणि मला फक्त तीन महिने काढायचे होते. मी सावरकर भक्त आहे आणि याचा मला खुप फायदा झाला. खुप पुस्तकं वाचली, राजेश देशपांडेंनी दिलेलं 'हिमालयाची सावली' हे नाटकं वाचून काढलं. विशेष म्हणजे मी या नाटकात काम करावं यासाठी राजेश आणि नाटकाचे निर्माते मी बरा होईपर्यंत थांबण्यासाठी तयार आहेत हे ऐकून खुप छान वाटलं होतं. असे ते म्हणाले. सहा महिने घेतलेल्या औषधोपचार आणि किमोथेरेपीमुळे या आजारातून पूर्णपणे बरे झालो असल्याचे सांगत आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालो असल्याचे त्यांनी सांगितलं.