'भारत' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धूम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2019
Total Views |



अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी चित्रपटाने ४२.३ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धूम माजवली. अली अब्बास जफर यांनी याआधी दिग्दर्शित केलेल्या टायगर जिंदा है या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई ३४ कोटी तर सुलतान चित्रपटाची कमाई ३६ कोटी होती त्यामुळे आता या दोन्ही चित्रपटांना मागे टाकून 'भारत' ने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सलमान हा प्रेक्षकांना आकर्षित करणारा सर्वात मोठा कलाकार ठरला आहे असे म्हणत या चित्रपटाच्या कामाईविषयी माहिती दिली आहे. सलमान आणि कतरीना कैफ यांनी या आधी टायगर जिंदा है या चित्रपटात देखील आपल्या केमेस्ट्रीची झलक प्रेक्षकांना दिली होती आणि आता या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्रपटाच्या कमाईवरून लक्षात येत आहे.

हा चित्रपट आज देशभर प्रदर्शित झाला असून चित्रपट भविष्यात आणखी किती कमाई करतो आणि समीक्षकांचे या चित्रपटाविषयीचे मत जाणून घेणे हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@