मुंबई : पावसाळा सुरु झाला असला तरी म्हणावा तसा पाऊस अद्याप झाला नाही. मान्सूनचे वारे जरी वाहत असले तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. अशामध्ये आता मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला मुंबई महापालिकेने दिला आहे. जुलैपर्यंत शिल्लक असेल एवढाच पाणी साठा अद्याप शिल्लक आहे अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील राखीव साठय़ामधून आता पाणीपुरवठा केला जात आहे. सदर पाणी पुरवठय़ाद्वारे मुंबईवासियांना जुलैअखेरपर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येईल, असे पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यामुळे जर मान्सूनचे वेळेवर आगमन झाले नाही तर मुंबई पाणीटंचाईचे संकट येईल असे जाणकारांनकडून सांगण्यात येत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat