'भारत' ने पार केला २०० कोटींचा आकडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2019
Total Views |

 


पहिल्या काही दिवसातच बॉक्स ऑफिसवर आपली जादू पसरवणाऱ्या अली अब्बास जफर दिग्दर्शित
'भारत' या चित्रपटाने आज १३ व्या दिवसानंतर २०० कोटींची कमाई करून आणखी एक विक्रम रचला. ५ जूनला ईदीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या तीन दिवसातच चित्रपटाने विक्रमी कमाई करत १०० कोटींच्या घरात कमाई केली आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावर नेऊन ठेवल्या. नंतर वर्ल्ड कप आणि अन्य कारणांमुळे आठवड्याभरात चित्रपटाच्या कमाईमध्ये थोडीशी घसरण होते की काय? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता.

मात्र आज या प्रश्नाला 'भारत' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील २०० कोटींच्या कमाईमुळे उत्तर मिळाले आहे. सलमान खान आणि कतरीना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात चार पिढ्यांची एक कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सुरुवातील प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्साह दिसून आला मात्र हळूहळू तो ओसरल्याचे दिसून आले.

'भारत' चित्रपट सध्यस्थितीत 'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील विक्रम मोडण्याच्या काहीसाच मागे आहे. विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या 'उरी' चित्रपटाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त पसंती मिळाली, तीन आठवड्यात चित्रपटाने २४४ कोटींची कमाई केली होती. आता 'भारत' हा विक्रम किती आकड्यांनी मोडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@