पाकड्यांवर विजय हा आणखी एक सर्जिकल स्ट्राईक : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विजयाची तुलना सर्जिकल स्ट्राइकशी केली आहे.

 

"भारताने पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राइक केल्याची प्रतिक्रिया शहा यांनी व्यक्त केली. भारतीय संघाचे कौतूक करत आमच्या क्रीकेट संघाने आणखी एक सर्जिकल स्ट्राईक केल्याचे म्हटले आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राइक केला आणि पूर्वी सारखाच हा सर्जिकल स्ट्राइक आहे. संपूर्ण टीम इंडियाचे अभिनंदन. तुमची कामगिरी उत्तम आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाला या विजयाबद्दल अभिमान आहे," असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भारतीय संघाला भरभरून शुभेच्छा दिल्या. भारतीय संघाने या प्रतिष्ठेच्या आणि महत्वाच्या सामन्यात विजय मिळवून दिल्याबद्दल त्यांनी संघाचे आभार मानले. आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

राजकीय वर्तूळातील इतर मान्यवरांनीही टीम इंडियाचे कौतूक केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी भारतीय संघाचा फोटो शेअर केला आहे. पाकिस्तानवरील शानदार विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन, असे ट्विट करत गोयल यांनी पुढील सामन्यांसाठी टीम इंडियाला शुभेच्छाही दिल्या.

 

भारत जिंकेल पाकिस्तान हरेल, हे आम्ही आधीच सांगितले होते, असे म्हणत किरण रिजीजू यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. राज्यवर्धन राठोड आणि अशोक गेहलोत यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केलं आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@