देशातील महत्वाच्या ९१ धरणांमधील पाणीसाठ्यात १ टक्क्याने घट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2019
Total Views |






देशातील महत्त्वाच्या ९१ धरणातल्या जलसाठ्यांमध्ये मागील आठवड्यात २९.१८९ अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून
, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते १८ टक्के इतके आहे. गेल्या आठवड्यात हा पाणीसाठा १९ टक्के इतका होता.

या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता १६१.९९३ अब्ज घनमीटर इतकी आहे. ९१ पैकी ३७ जलसाठ्यांवर ६० मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून, यामध्ये २७ धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता ३१.२६ अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या ३.११ अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे.

हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला जलसाठा उपलब्ध आहे.

राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, ओदिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत कमी आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@