झारखंडमध्ये नक्षलींकडून पाच जवानांची हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2019
Total Views |


सरायकेला : झारखंडच्या येथील तिरूलडीह परिसरात शुक्रवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी पाच पोलिस जवानांची हत्या केली आहे. घटनेनंतर नक्षली पोलिसांकडील हत्यारेही घेऊन गेले आहेत. घटना झाल्यापासून एक जवान बेपत्ता झाला आहे. तुर्तास नक्षलवाद्यांचा तपास सुरू आहे.

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहीतीनुसार, सहा पोलिस कर्मचारी कुकड़ू गावत काही कामानिम्मीत गेले होते. त्यानंतर ते गावातील बाजार काही खरेदी करण्यासाठी गेले. यादरम्यान सहा गाद्यांवरून नक्षलवादी आले आणि त्यांनी पोलिसांवर अंदाधुद गोळीबार सुरू केला. यात पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना झाल्यानंतर नक्षली पोलिसांचे हत्यारे घेऊन पळून गेले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@