लघू उद्योग आणि रोजगार निर्मिती हेच लक्ष : नितीन गडकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2019
Total Views |


 


नागपूर : "राज्यातले सगळे सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्णत्वास आणणार. तसेच, रस्त्यांच्या लगत १२५ कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचे लक्ष्य आहे. येत्या तीन वर्षात सगळ्या महामार्गांची कामे पूर्ण होतील.शिवाय देशातील सर्वात मोठी समस्या असलेल्या रोजगार निर्मितीवरही भर देणार आहोत." अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीनजी गडकरी यांचे शनिवारी नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नागपूरकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

 

माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांविषयी चर्चा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भूपृष्ठ, रस्ते वाहतूक, जहाज मंत्रालय, तथा सूक्ष्म व लघू उद्योगमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. "लघू उद्योग आणि रोजगार निर्मिती करणे हे माझ्यापुढचे लक्ष्य आहे. या सत्रात जलसंधारण खात्याची जबाबदारी नाही. मात्र, सहकारी मंत्र्यांच्या मदतीने जलसंधारणाचे कामे करून घेणार आहे. राज्यात १७० पूल तसेच बंधारे बांधणार आहे. शिवाय राज्यात पाणीसाठी वाढवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे." असे गडकरी यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@