खबरी असल्याच्या संशयातून नक्षलींनी केली हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019
Total Views |


 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा कहर सुरूच आहे. दरम्यान आता पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन गेल्या २४ तासात नक्षलवाद्यांनी दोघांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारीच भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी एकाची हत्या केली होती. त्यानंतर सोमवारी एटापल्ली तालुक्यातील बांडे गावालगत एकाची हत्या केली आहे. शिशिर सरकार, असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.


सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. दिवसातील ही चौथी घटना आहे. महाराष्ट्र दिनाच्या पहाटे कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे २७ वाहनांची केली होती जाळपोळ केली होती. त्यानंतर जांभूळखेडा येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये १५ जवानांना वीरमरण आले होते. काल भामरागड तालुक्यातील एकाची केली होती हत्या केली आहे. 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@