नवी मुंबई नागरिकांसाठी खुशखबर; अभय योजनेला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |




मुंबई : नवी मुंबई परिसरात येणारी सिडको प्रशासित गावे आणि शासकीय नळ जोडणी धारकांसाठी खुशखबर आहे. परिसरातील नागरिकांसाठी अभय योजनामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे. यामुळे येथील रहिवासीयांना पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करण्यात येणार असून मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व ६ महिने कालावधीमध्ये भरण्याची मुभा मिळणार आहे.

 

सिडको क्षेत्रातील गावे आणि शासकीय नळ जोडणी धारक यांच्याकडील थकित पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत होती. यामध्ये काही ग्राहकांकडून थकित रक्कम सिडकोकडे जमा देखील झाली आहे. मात्र अद्यापही काही थकबाकीदारांनी रक्कम भरलेली नाही. नवी मुंबईतील नवीन पनवेल, काळुंद्रे, कळंबोली, नावडे, करंजाडे, कामोठे, खारघर, द्रोणागिरी, उलवे तसेच आजुबाजूची गावे मिळून मार्च २०१८ अखेर ८६ कोटी ८० लाख रुपये थकित आहेत. यापैकी ग्रामपंचायत व सरकारी कार्यालयांकडे यातील ४२ कोटी ६१ लाखांची रक्कम थकित आहे. यापैकी १६ कोटी ७८ लाखांची रक्कम ही विलंब शुल्क आहे. तर २५ कोटी ८३ लाख रुपये ही मूळ रक्कम आहे.

 

दरम्यान, थकित रक्कम भरताना विलंब शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी काही ग्रामपंचायत व सरकारी कार्यालयांनी केली होती. त्यानुसार सिडको संचालक मंडळाने प्रस्ताव तयार करुन त्यास मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@