कॉंग्रेसला २३ पैकी १७ राज्यात एकही जागा नाही : ६ राज्यात प्रत्येकी एक जागा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2019
Total Views |



 
 

नवी दिल्ली : अनेक राज्यात स्वबळावर लढून केंद्रातील भाजप सरकारला रोखणाऱ्या काँग्रेसचा देशभरात प्रचंड पराभव झाला आहे. या निवडणुकीत देशातील २३ राज्यांतून काँग्रेसजवळपास हद्दपार झाली आहे. या २३ पैकी १७ राज्य काँग्रेसमुक्त झाले आहेत, तर ६ राज्यांत काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे.

 

तीन महत्वाची राज्ये हाताशी असूनही अपयश

कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान विधानसभेत भाजपला धक्का देत सत्ता मिळूनही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपदही टिकवता आलेले नाही. विधानसभेत सत्ता असलेल्या राज्यांतही भाजपने धुळ चारली आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेश आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना पश्चिम उत्तर प्रदेशाची जबाबदारी नीट सांभाळता आलेली नाही.

 

कॉंग्रेसमुक्त केंद्रशासित प्रदेश

विधानसभेत सत्ता असताना राज्य गमावल्यानंतर केंद्रशासित प्रदेशही कॉंग्रेसमुक्त झालेले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ६ जागांपैकी ३ जागांवर भाजप तर ३ जागांवर नॅशनल कॉन्फरन्सने आघाडी घेतली. कॉंग्रेसने या जागेवर खातेही उघडले नाही. कॉंग्रेस सत्तेत आल्यास कलम १२४ अ आणि AFSPA कायदा रद्द करणार असल्याचे जाहीरनाम्याद्वारे प्रसिद्ध केले आणि येथील जनमत कॉंग्रेसने गमावले.

 

पूर्वेकडील राज्येही गमावली

पूर्वेकडील महत्त्वाचे राज्य मानले जाणाऱ्या अरुणाचल प्रदेशात दोन्ही जागांवर भाजप मोठ्या फरकाने जिंकली आहे. बिहार लालू प्रसाद यादव यांच्यासोबत युती करून लढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न बिहारमध्ये फारसा यशस्वी झाला नाही. भाजप आणि जेडीयूने ४० पैकी ३९ जागा जिंकल्या आहेत. केवळ एक जागा कॉंग्रेसच्या पारड्यात पडली आहे, त्यामुळे आता बिहार सुद्धा काँग्रेसमुक्त झालेले आहे.

 

गुजरातमध्ये २६ पैकी २६ जागांवर भाजप

गुजरातमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळेल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात गुजरातही काँग्रेसमुक्त झाले. गुजरातमधील २६ पैकी २६ जागांवर भाजपनं दणदणीत विजय मिळविला. हरियाणातही भाजपने दहाही जागांवर विजय मिळवत काँग्रेसला आस्मान दाखवले.

 

हिमचाल प्रदेशमध्ये सर्व जागा भाजपकडे

हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशातही भाजपने विजयाची घोडदौड सुरूच ठेवली. हिमाचलमध्ये भाजपने चारही जागा जिंकल्या. २०१४ मध्येही काँग्रेसला हिमाचलमध्ये खातेही उघडता आलेले नाही,

 

उत्तराखंड मध्यप्रदेशमध्ये सुपडा साफ

उत्तराखंडमधील पाचही जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे उत्तराखंड सुद्धा काँग्रेसमुक्त झाल्याचं चित्रं आहे. मध्यप्रदेश मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता मिळवली. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसला मोठे यश मिळेल असे म्हटले जात होते. मात्र, प्रत्यक्षात मध्यप्रदेशातील २९ जागांवर भाजपने आघाडी घेतली असून काँग्रेस केवळ एकाच जागेवर आघाडीवर आहे.

 

महाराष्ट्रात कॉंग्रेसचा एकच खासदार

महाराष्ट्र महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळविता आला आहे. तर एनसीपीने ३ जागा जिंकून काँग्रेसला मागे टाकले आहे. या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींविरोधात प्रचार केला होता. पण तरीही त्याचा काँग्रेसला फायदा झाला नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादीला मनसेच्या सभांचा फायदा उचलता आला नसल्याचा आरोप मनसेने केलेला आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने सर्व जागांवर उमेदवार दिल्याने त्याचा दोन्ही काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे अशोक चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 

मणिपूर, मिझोराममधूनही हद्दपार

मणिपूर मणिपूरमध्ये अवघ्या दोनच जागा आहेत. त्यापैकी एका जागेवर भाजप तर दुसऱ्या जागेवर नागा पिपल्स फ्रंटने विजय मिळवून काँग्रेसला मणिपूरमधून हद्दपार केले आहे. मिझोराम मिझोरामधील एकमेव जागेवर मिझो नॅशनल फ्रंटने आघाडी घेतली आहे. ओडिशा ओडिशातील ७ जागांवर भाजपने तर १४ जागांवर बीजेडीने आघाडी घेतली आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला ओडिशात खातेही उघडता आलेले नाही.

 

दिल्लीही दूरच

दिल्लीत काँग्रेस आणि आपमधील वादाचा भाजपला मोठा फायदा झाला. दिल्लीतील सातही जागा भाजपने जिंकल्या. राजस्थान राजस्थान पुन्हा एकदा भाजपक़डेच गेले आहे. राजस्थानमध्ये सत्ता असूनही काँग्रेसला यश मिळाले नाही. भाजपने येथे २४ जागांवर आघाडी घेतली. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने एका जागेवर आघाडी घेतली आहे. सिक्कीम सिक्कीममधील एकमेव जागेवर सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने आघाडी घेतली आहे.

 

उत्तर प्रदेशही गमावले

उत्तर प्रदेशातील ८० पैकी केवळ एकाच जागेवर काँग्रेस विजयी झाली. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून विजय मिळविला. विशेष म्हणजे काँग्रेसची परंपरागत सीट असलेल्या अमेठीतून राहुल गांधी यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. उत्तर प्रदेशात ५९ जागांवर भाजप, ६ जागांवर सपा आणि १२ जागांवर बसपा आघाडीवर आहे. पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमधील ४१ जागांपैकी २२ जागांवर तृणमूल तर १९ जागांवर भाजपने आघाडी घेतली. काँग्रेसला केवळ एकाच जागेवर आघाडी मिळाली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@