भारतीय जनतेचा निर्णय मान्य : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : "जनता मालक आहे आणि जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे." अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

 

"जनता मालक आहे. त्यांच्या निर्णय मान्य़ आहे. आमची लढाई विचारांशी होती. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना मला विश्वास द्यायचा आहे की, आपल्या विचारधारेला आपल्याला जिंकावयाचे आहे. काँग्रेसच्या विचारांना मानणारे देशात अनेक लोक आहे. मी स्मृती इराणी यांचे देखील अभिनंदन करतो. त्यांनी अमेठीच्या जनतेचा प्रेमाने सांभाळ करावा. जनतेने त्यांना निवडले आहे." अशाप्रकारे त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून जनतेला आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहे..

 

पुढे राहुल गांधी यांनी सांगितले की, "माझ्यावर कितीही टीका केली. माझ्याबद्दल कितीही वाईट शब्द बोलले गेले तरी मी त्यांना प्रेमाने उत्तर देईन. मी माध्यमांचे देखील अभिनंदन करतो." लोकसभा निवडणुकीत भाजपल्या मिळालेल्या बहुमतानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली. देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या बाजुने निकाल दिला आहे. २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत भाजपला अधिक यश मिळताना दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@