भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी साधली 'ही' किमया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९चे निकाल हे ऐतिहासिक ठरले आहेत, यात काहीच शंका नाही. अनेक प्रकारे या निकालाने इतिहास रचले आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीमुळे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वबळावर पहिल्यापेक्षा जास्त जागा जिंकणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

 

२०१४मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता मोदींनी पुन्हा एकदा असाच विजय मिळवला आहे. देशातील जनतेने १९८४नंतर एखाद्या पक्षाला प्रथमच इतके मोठे यश मिळवले आहे. ८४मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना जनतेने मोठा कौल दिला होता.

 

सध्याच्या आकडेवारीनुसार, एनडीएने ३५०हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. यामध्ये एकट्या भाजप पक्षाने ३००ची आघाडी मिळवली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा २८२ एवढा होता. तर, युपीएला फक्त ९० जागांवर आघाडी मिळवली आहे. २०१४प्रमाणे याही वर्षी नरेंद्र मोदींच्या वर्चस्वाने भाजपने बाजी मारली आहे. निकालाच्या आधी जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलनी मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तोच अंदाज खरा ठरेल अशा पद्धतीने कल येत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@