राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2019
Total Views |



मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. राज्यातील २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक होणार आहे. यासोबतच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांची निवडणूक रंगणार आहे. २३ जून २०१९ रोजी यासाठी मतदान होणार असून यासाठी आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

 

जुलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ३१ मे २०१९ ते ६ जून २०१९ या कालावधीत स्वीकारले जाणार असल्याची माहिती सहारिया यांनी दिली. नामनिर्देशनपत्रांची छाननी ७ जून २०१९ रोजी होईल. तर नामनिर्देशनपत्रे १० जून २०१९ पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल व २३ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.

 

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

 

पालघर- ७, रायगड- ८, रत्नागिरी- १, नाशिक- ७४, धुळे- १, जळगाव- १, अहमदनगर- १०, पुणे- ३, सातारा- ३, सांगली- १, कोल्हापूर- १, उस्मानाबाद- १, लातूर- २, नांदेड- १, अकोला- १, यवतमाळ- ३, वाशीम- १, बुलडाणा- १, वर्धा- ४ आणि चंद्रपूर- २२

 

पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा

 

ठाणे- १, पालघर- २, रायगड- १०, रत्नागिरी- ५, सिंधुदुर्ग- १, नाशिक- ३, अहमदनगर- १, नंदुरबार- २, पुणे- ३, सोलापूर- १, सातारा- ६, औरंगाबाद- ४, नांदेड- ८, उस्मानाबाद- २, परभणी- १, वाशीम- ५, बुलडाणा- १, चंद्रपूर- १ आणि भंडारा- ५

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@