अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' हा चित्रपट ५ जूनला भारतभर प्रदर्शित होणार आहे. त्या आधी आज 'भारत' मधील 'जिंदा' नावाचे गाणे प्रदर्शित झाले आहे. सामान्य माणसाची असामान्य कथा या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे याची झलक आपण या गाण्यामध्ये पाहू शकतो. 'जिंदा' हे गाणे खरेच सलमान खानच्या जगण्या-मारण्याच्या प्रश्नांवर भाष्य करणारे आहे असे गाणे पाहिल्यावर जाणवते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat