सॅम पित्रोदांना लाज वाटायला हवी : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2019
Total Views |





फतेहगड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या शीखविरोधी दंगलीवरुन काँग्रेसला लक्ष्य केल्यानंतर काँग्रेस नेते सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. शीखविरोधी दंगलीबद्दल केलेल्या विधानाची सॅम पित्रोदांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पित्रोदांना सुनावले आहे. "पित्रोदांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागायला हवी," असेदेखील गांधी म्हणाले. ते पंजाबमधल्या फतेहगडमध्ये जनसभेला संबोधित करत होते.

 

पित्रोदा यांनी माफी मागायला हवी

"१९८४ मध्ये झालेल्या दंगलीबद्दल पित्रोदा जे काही बोलले, ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यासाठी त्यांनी देशाची माफी मागायला हवी. ते जे काही बोलले, ते अत्यंत चुकीचे होते हे मी त्यांना सांगितले आहे. त्यांना या विधानाबद्दल लाज वाटायला हवी, त्यांनी या प्रकरणाबद्दल जाहीर माफी मागायला हवी,' असे राहुल गांधी म्हणाले.

 

काय म्हणाले होते पित्रोदा ?

पित्रोडा यांना शुक्रवारी १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर जे झालं ते झालं, असे उत्तर त्यांनी दिले. सॅम पित्रोडांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या सर्वच नेत्यांनी जोरदार टीका केली. पित्रोडांच्या विधानातून काँग्रेसचा अहंकार आणि चारित्र्य दिसते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

 

मोदींची टिका

'काँग्रेसचे वरिष्ठ नेते 1984 मध्ये दंगल झाली तर झाली असं म्हणतात. हे नेते कोण आहेत तुम्हाला माहीत आहे का? ते गांधी कुटुंबाच्या अत्यंत जवळचे आहेत. ते राजीव गांधींचे खूप चांगले मित्र होते आणि काँग्रेसच्या नामदार अध्यक्षांचे गुरू आहेत,' अशी घणाघाती टीका मोदींनी शुक्रवारी रोहतकमधल्या जनसभेत केली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@