नक्षलवाद्यांकडून जळीतकांड ; ५ कोटींपेक्षा जास्त नुकसान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019
Total Views |



गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात जाळपोळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. १ मे महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोलीत जवळपास ५० वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. कुरखेडा तालुक्यातील दादापूर इथे रात्री अकरा ते तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

पुराडा पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या दादापूर येथून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते. या कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर यांसह ५०पेक्षा जास्त वाहने जाळण्यात आली आहेत. तसेच दादापूर येथील डांबर प्लांट, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही नक्षलवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले. नक्षलवाद्यांनी अचानक झालेल्या या जाळपोळीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@