विकसित महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019
Total Views |




मुख्यमंत्री आणि महापौरांकडून यांची हुतात्म्यांना आदरांजली

 

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याचा ५९ वा स्थापना दिवस मुंबईतील शिवाजी पार्क येथे साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. राज्याला विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी आवाहन केले. मुंबईतील हुतात्मा स्मारकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर देखील उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातली राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राज्यपालांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन केले. पुढे त्यांनी सांगितले की, "महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. हे देशातील सर्वाधिक साक्षरता असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती चांगली आहे. राज्याचा विकास दिवसेंदिवस जोमाने होत आहे. देशातील आघाडीच्या राज्यापैकी महाराष्ट्र आहे." यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आयुक्त अजॉय मेहता आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@