काँग्रेस का हाथ, देशद्रोहियों के साथ ; पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2019
Total Views |



इटानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर हल्लाबोल केला आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाटी येथील प्रचारसभेत त्यांनी काँग्रेसचा हाथ हा देशद्रोहियांना साथ असल्याचे त्यांच्या जाहीरनाम्यावरून सिद्ध होते अशी टीका त्यांनी केली. तिरंगा जाळणाऱ्यांना, 'भारत के टुकडे होंगे'चा नारा देणाऱ्यांना, विदेशी शक्तींच्या हातचे बाहुले बनणाऱ्यांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे तोडणाऱ्यांना काँग्रेसचे समर्थन असल्याचेही त्यांनी यावेळी आरोप केला.

 

काँग्रेसने देशात फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, हिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच देशाला शिव्या देणाऱ्यासाठी योजना तयार केली असून काँग्रेसचा हा जाहीरनामा बनावट असल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेसचा हा जाहीरनामा नसून ढकोसलापत्रआहे. देशाला विकासाकडे घेऊन जाणारे आमचे सरकार, तर दुसरीकडे केवळ खोटी आश्वासने देणारे नामदार आहेत. त्यांच्या खोट्या आश्वासनांप्रमाणेच त्यांचा जाहीरनामाही खोटा असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली.

 

काँग्रेसने आपल्या २००४च्या जाहीरनाम्यात २००९पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचेल असे आश्वासन दिले होते. मात्र, काँग्रेस हे आश्वासन पूर्ण करू शकले नाही. देशातील १८ हजार गावांमध्ये अंधार असल्याचे आम्हाला सत्तेत आल्यानंतर जाणवले. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत ते जनतेला मूर्ख बनविण्याचे काम करत असून दिलेली आश्वासने पाळत नाहीत. दरम्यान, या प्रचार सभेवेळी त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@