मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यामध्ये सोमवारी राज्यातील १७ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. या टप्प्यात तीन कोटी ११ लाख ९२ हजार ८२३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती राज्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून देण्यात आली. यात एक कोटी ६६ लाख ३१ हजार पुरुष तर एक कोटी ४५ लाख ५९ हजार महिला मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.
महाराष्ट्रात सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी
> उत्तर मुंबई - ७.८५ %
> उत्तर-पश्चिम मुंबई - ६.९० %
> ईशान्य मुंबई - ७.०० %
> उत्तर-मध्य मुंबई - ५.९८ %
> दक्षिण-मध्य मुंबई - ६.४५ %
> दक्षिण मुंबई - ५.९१ %
> नंदुरबार - ८.७३ %
> धुळे - ६.३१ %
> दिंडोरी - ७.२८ %
> नाशिक - ६.६९ %
> पालघर - ७.८६ %
> भिवंडी - ६.२१ %
> कल्याण - ५.०० %
> ठाणे - ६.७७ %
> मावळ - ६.६७ %
> शिरुर - ७.०७ %
> शिर्डी - ७.२८ %
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat