पुस्तकांमुळे आपलं बालपण सुखात गेलं. लहानपणी आपल्याला शिकवलेल्या कविता अजूनही आपल्याला आठवत असतीलच. किती छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला खूप व्यापक संदेश दिला जातो मग ती गोष्ट ससा कासवाची का असेना, काहीतरी करण्याची इच्छा आणि जिद्द असलेला माणूस कितीही संकटं आली तरी आयुष्यात यशस्वी होऊ शकतो हा विचार किती साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला मिळाला. अशाच अनेक गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या आहेत.
तिन्हीसांजेच्या वेळी हातात पुस्तक घेऊन आजी आजोबा त्यांच्या नातवंडांना घेऊन झोपाळ्यावर बसलेले आहेत आणि त्या तांबूस आकाशातून चंद्र जसजसा तशी लहानग्यांच्या पापण्यांवर झोप यायला सुरुवात होते. वाह...किती सुंदर दृश्य आहे नाही का. हेच दृश्य मनात साठवून आपण मोठे होत गेलो. आणि आता पुस्तकांचाच आपल्याला विसर पडत चाललाय. पुस्तकाची जागा आता स्मार्ट फोनने घेतली पण ती मायेची उब मात्र हरवली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat