भिवंडीत कंपनीतील आगीत लाखोंचे नुकसान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2019
Total Views |




ठाणे :
भिवंडीमधील काल्हेर येथे एका कंपनीला भीषण आग लागली असून आगीत लाखोंची वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भिवंडी व ठाणे महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळावर धाव घेत आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

काल्हेर येथे जय माता दी कंम्पाऊंडमध्ये एका कंपनीला सोमवारी पहाटे ५.४० वाजता भीषण आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट परिसरात पसरले. भिवंडी अग्निशमन केंद्र व ठाणे महापालिकेच्या अग्निशमन केंद्रातून बंब आणि पाण्याचे टँकर मागवण्यात आले.

 

अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न आहेत, अशी माहिती भिवंडी अग्निशमन केंद्राकडून देण्यात आली. या आगीत कोणतिही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यात मोठ्या प्रमाणावर कंपनीचे नुकसान झाले आहे. यापूर्वीही ३१ डिसेंबरला भिवंडीत कापडाच्या एका कारखान्याला भीषण आग लागली होती. त्यात मोठे नुकसान झाले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@