यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनतेसोबत गुंडागर्दी करण्याचे, त्यांचे पैसे लुटण्याचे, त्यांचा विकास रोखण्याचे काय परिणाम असतात, हे पश्चिम बंगालची जनता यावेळी दीदींना शिकवणार आहे. लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यानंतर आलेल्या आकडेवारीनंतर स्पीडब्रेकर दीदीची झोप उडाली असून जनतेसोबत गुंडागर्दी करण्याचे काय परिणाम असतात हे दीदींना येत्या २३ मे ला कळेल.
यावेळी त्यांनी बुआ-भतीजा सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, हे बुआ-भतीजा पश्चिम बंगालच्या संस्कृतीला, येथील लोकांना बदनाम करत आहेत, हे लज्जास्पद आहे. आपल्या शूरवीर सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा सफाया केला, याचा दीदी पुरावा मागतात. पण दीदी, पुरावे शोधायचेच आहेत तर चिटफंड घोटाळा करणाऱ्यांचे शोधा, गरिबांचे पैसे हडपणाऱ्यांविरुद्ध पुरावे शोधा. यावेळी मोदींनी भाजप सरकारच्या काळात केलेल्या विकासकामांचा लेखाझोखा जनतेसोमोर मांडला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat