मनोज कोटक दिल्लीत जाणे ही, मुंबईची गरज : अॅड. आशिष शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |


मुंबई : मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला आहे. अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते.

 
'कोटक प्रचंड मताधिक्याने निवडणून येणार'

मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात अॅड. शेलार यानी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी बोलताना अॅड. शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्याप्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे. त्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहाउमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,' असा विश्वासही अॅड. शेलार यांनी व्यक्त केला.

 

शिवसेनेतर्फे शिशिर शिंदेही प्रचारात

शिवसेना लोकसभा उमेदवार शिशिर शिंदें यांनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, 'मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही, असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो. जनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व, असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

 

जनमानस आमच्या बाजूने : कोटक

मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले कि, 'आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारीसक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल.' जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोकसज्जा आहेत, असेही ते म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@