मुफ्ती, अब्दुल्ला कुटुंबांनी केल्या काश्मीरच्या पिढ्या उध्वस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. भाजपाचा प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांत प्रचार सभा घेत आहेत. अशाच जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या प्रचार सभेत 'मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबांनी काश्मीरच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त केल्या. त्यांनी काश्मीरचे प्रचंड शोषण केले आहे.' अशा कठोर शब्दात त्यांनी मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबावर टीकास्त्र सोडले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधली ही त्यांची पहिली प्रचार सभा होती. यावेळी त्यांनी काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांवर सडकून टीका केली.

 

'कितीही शिव्या दिल्या तरी देशाचे तुकडे होऊ देणार नाही' अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यासह काँग्रेसला ठणकावले. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये पंतप्रधानांनी विविध मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले. न्याय योजनेच्या नावाखाली काँग्रेस देशवासियांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही मोदींनी केला. काँग्रेस आणि महाआघाडीच्या नेत्यांच्या राष्ट्रभक्तीचा बुरखा फाटल्याचा घणाघातही मोदींनी केला आहे. मोदींनी जम्मू-काश्मीरमधील काश्मीर पंडितांच्या पलायनचाही मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसच्या धोरणांमुळेच काश्मीरी पंडित बंधु-भगिणींना आपले घर सोडावे लागल्याचा आरोपही मोदींनी काँग्रेसवर केला आहे. काँग्रेसला त्यांच्या मतांबाबत इतकी काळजी होती की, काश्मीरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचारांकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याची टीकाही काँग्रेसवर करण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@