भीती झुगारून मतदानाला उदंड प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |


 


गडचिरोली : गडचिरोलीतील ज्या भागात कुठलाही पक्ष अथवा उमेदवार प्रचारासाठी फिरकत नाहीत. जिथे उमेदवार कोण आहे हेच मतदारांना माहित नसते अशा गडचिरोलीच्या दुर्गम आणि अतिसंवेदनशील भागात मतदान प्रक्रिया पार पाडणे अत्यंत कठिण काम ठरते. परंतु, नक्षलवादाचे सावट असतानाही गडचिरोलीतील दुर्गम आणि अतिसंवेदनशील गावांमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. 

 
विदर्भात ८ जिल्ह्यांमध्ये ७ मतदारसंघांमध्ये मतदान चालू आहे. विदर्भात सरासरी १३.०७ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत भंडारा-गोंदियामध्ये १५.५ टक्के, चंद्रपूरमध्ये ९.५ टक्के, यवतमाळ-वाशिममध्ये १२.०६ टक्के, गडचिरोलीत १८ टक्के, रामटेकमध्ये ९ टक्के मतदान पार पडले. अतिदुर्गम अशा कसनसून पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्राजवळ सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला, यात कोणतेही नुकसान झाले नाही.
 

छत्तीसगड सीमेवर मतदारांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यातील एका मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी आईडीचा स्फोट घडवून आणला होता. नारायणपूर जिल्हा हा गडचिरोलीतील भामरागड सीमेला लागून असलेला जिल्हा आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. केवळ दहशत पसरवण्यासाठीच हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा सुरक्षा यंत्रणेचा अंदाज आहे. तसंच छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर मतदानावर बहिष्कार टाकण्याचे बॅनरही लावण्यात आलेले दिसले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@