'पुतण्यानेच घेतली काकांची विकेट' : शरद पवारांवर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2019
Total Views |



वर्धा : "पंतप्रधान पदाची स्वप्न बाळगणारे आता निवडणूक लढवण्यासही घाबरत आहेत. हवेच्या बदलाची दिशा त्यांनी ओळखून हा निर्णय घेतला आहे, त्यांच्या पुतण्याकडूनच आता पुण्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याने पवारांची हिट विकेट पडली," असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत केला.

 

नरेंद्र मोदी म्हणाले कि, "राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आता कौटुंबिक युद्ध जोरदार पातळीवर सुरू आहे. पुतण्या अजित पवार यांच्या राजकारणामुळे हळूहळू शरद पवार यांची पक्षावरील पकड संपत चालली आहे. पुतण्या त्यांचा पक्ष ताब्यात घेऊ इच्छित आहे," अशी टीका अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी पवारांवर केली.

 

"पवार हे अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत, ते जे काही करतील, ते विचारपूर्वक करतात. बदलती हवा ओळखल्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूकीतून घेतलेली माघार असा टोला त्यांनी लगावला. कौटुंबिक युद्धामुळे पवारांना नेमके कुणाला तिकीट द्यायचे हा संभ्रम होता.", असे सांगत घराणेशाहीमुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांचे मनोबलही खचल्याचे मोदी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@