कल्याण : मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा विचित्र अपघात गुरुवारी पाहायला मिळाला. एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने इंजिन दोन डब्बे पुढे गेली तर बाकीचे डब्बे मागेच राहिले. कल्याणच्या पत्रीपूल परिसरात हा प्रकार घडला. यामुळे चाकरमान्यांचे मात्र हाल झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे मध्य रेल्वेवरील वाहतुकीला फटका बसला. कर्जतहून येणाऱ्या जलद गाड्या तात्पुरत्या वळवल्या असून धीम्या गाड्या १५ ते २० मिनिटांनी उशिरा चालू आहेत. सध्या कपलिंग जोडण्याचे सुरु असून लवकरच मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat