सुमारे ३ लाख कोटींचा ग्रीन रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार येथे उभारण्यात येणार होता. या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या नव्या जागेसाठी सौदी अरेबियाची अराम्को कंपनीची तसेच या कंपनीच्या भारतातील भागीदारांची मान्यता घेण्यात आली आहे. त्यानंतरच ही जमीन अधिग्रहित केली गेली. अशी माहिती सरकारमधील काही उच्च अधिकाऱ्यांकडून एका वृत्तसंस्थेला देण्यात आली. रोहा, अलिबाग आणि मुरुड येथे या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी सिडकोच्या माध्यमातून वसाहत उभारण्यात येणार आहे.
प्रकल्पासाठीच्या एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी निवड करण्यात आलेल्या गावांची नावे पुढील प्रमाणे आहेत :
अलिबाग – भोनंग, ताजपूर, रामराज, सुडकोली, कुंदे, नवखार, मालाडे, तळवली
मुरुड – तळे, चोरढे, सारवली, वळके, तळेखार, शिरगाव, तडगाव, आमली, येसदे, सातीर्डे
रोहा – सारसोली, खोपे, खारखर्डी, नवखार, तळवडे, खैराळे, दीव, दापोली, धोडखार, धोंडखार उमटे, न्हावे, शिळोशी, कोकबन, खुटल, कजरविरा, आंबिवली, धगडवाडी, चांगगाव, शेडसई, सोनखार, महाळुंगे
श्रीवर्धन – मारळ
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat