हिंदू दहशतवादाच्या माध्यमातून काँग्रेसने हिंदूंना बदनाम केले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2019
Total Views |



बिजनोर : “हिंदू दहशतवादाचा वापर करून काँग्रेसने हिंदूंना बदनाम केले. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. राहुल गांधींनी मात्र यातून राजकारणालाही खराब केले. हिंदूंच्या बदनामीसाठी राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे,” अशा शब्दांत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जबरदस्त घणाघात केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर रविवारी उत्तर प्रदेशच्या बिजनोर शहरात आयोजित करण्यात आलेल्या विराट सभेत ते बोलत होते.

 

“काँग्रेसने हिंदूंवर दहशतवादाचा शिक्का लावला. पण सत्य कधीही लपून राहत नाही. सूर्याला कितीही ढगांआड लपवून ठेवले तरी सत्य आणि सूर्य तेजस्वीपणे तळपतच राहते. समझौता एक्सप्रेसप्रकरणी आलेल्या निकालातून हे सिद्ध झाले की, स्वामी असीमानंद आणि अन्य सर्वच लोक निर्दोष आहेत,” असे यावेळी अमित शाह म्हणाले. “विरोधक तुष्टीकरणाच्या राजकारणावरच अडून बसले आहेत, काही दिवसांपूर्वीच पंचकुला न्यायालयाने २००७ साली झालेल्या समझौता एक्सप्रेस गाडीतील बॉम्बस्फोट प्रकरणात निर्णय दिला व आरोपींना निर्दोष सोडले. मात्र, तत्कालीन काँग्रेस सरकार समझौता एक्सप्रेस स्फोट हिंदू दहशतवादाचे उदाहरण असल्याचे सांगत होते,” अशी टीकाही शाह यांनी केली. राहुल गांधी व काँग्रेसवर टीका करत अमित शाह यावेळी म्हणाले की, “काँग्रेसच्या मतपेटीच्या राजकारणाने देशाच्या सुरक्षेशी खेळ केला. राहुल गांधींच्या अमेठी सोडून केरळमध्ये निवडणूक लढवण्यासाठी पलायन करण्यामागे हेच कारण आहे. आताच्या निवडणुकीत अमेठीतील जनता सगळाच हिशोब पूर्ण करेल, असे त्यांना वाटते.”

 

दरम्यान, आजच्या सभेवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामांची माहितीही उपस्थित जनसमुदायाला दिली. “आमच्या सरकारने ऊसउत्पादक शेतकर्‍यांना आतापर्यंत ५७ हजार कोटींची भरपाई दिली,” असे योगी म्हणाले. सोबतच राहुल गांधींवर टीका करताना योगी म्हणाले की, “राहुल गांधी नेहमीच नकारात्मक गोष्टी करत राहतात. भारत अंतराळ महाशक्ती झाल्यावर पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले. मात्र, विरोधकांना त्याचे वाईट वाटले. काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालतात, तर मोदी सरकार दहशतवाद्यांचा खात्मा करते,” असेही ते म्हणाले.

 

हिंदू दहशतवादी कसा होईल?

 

काँग्रेसने संपूर्ण जगामध्ये विश्वबंधुत्वाची भावना जागृत करणाऱ्या हिंदूंना दहशतवादाशी जोडून बदनाम केले. पण मी विचारतो की, “हिंदू कधी दहशतवादी असू शकतो का? तर नाही. पण कदाचित राहुल गांधींना ही गोष्ट माहिती नाही की, आम्ही तर मुंगीलाही खाऊ घालणारे लोक आहोत, लोकांना कसे ठार मारू? मात्र दहशतवादाला धर्माशी जोडण्याचे पाप काँग्रेसने केले,” असा हल्लाबोल आज अमित शाह यांनी केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@