दि. ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार पडणार असून २३ मे रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर 'मुंबई तरुण भारत'च्या 'महा एमटीबी' या अधिकृत फेसबुक पेजवर हा कौल घेतला गेला होता. यात ७६७ वाचकांनी सहभाग घेतला होता. यापैकी ८१ टक्के म्हणजे ६२२ जणांनी मोदींच्या नावाला पसंती दिली, तर १४५ जणांनी राहुल यांना पसंती दिली. देशाच्या इतर सर्वेक्षणामध्येदेखील नरेंद्र मोदी यांच्या नावालाच पसंती मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या रणधुमाळीत कोण बाजी मारते हे येत्या २३ मे रोजीच समजेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat