दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधील तीन शहरांनाही हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सैन्य दलाचे तळ, शस्त्रे यांवर विशेष नजर ठेवली जाते आहे. दहशतवादविरोधी कारवाईसाठी सज्ज असलेली पथकंही शहरांमध्ये तैनात करण्यात आली आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. मुंबईत प्रमुख ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रेल्वेस्थानकावर सुरक्षा कडक करण्यात आली असून जीआरपी व आरपीएफ पोलिसांची गस्त रेल्वेस्थानकावर वाढविण्यात आली आहे. या ठिकाणी प्रवाशांसह त्यांच्या सामानाचीही चौकशी करण्यात येत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat