मुंबई : देशातील पहिले पोलीस साहित्य संमेलन सोमवारी मोठ्या दिमाखात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी पार पडले. या कार्यक्रमात जेष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांची उपस्थिती होती. यावेली बोलताना नायगावकर यांनी पोलिसांचे तोंड भरून कौतुक केले.
"पोलिसांच्या कार्यासारखे कुणाचेच कार्य नाही. अखिल भारतीय समेंलनापेक्षा उत्तम मुंबई पोलिसांचे संमेलन भरले आहे. शासनाने पोलिसांच्या साहित्य संमेलनाला अनुदान द्यावे. पोलिसांनी आपली ही कला जपून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कलेत खरच त्यांचे प्रतिबिंब दिसत असेल तर नक्कीच सर्वांनी ते पाहायला पाहिजे." असे अशोक नायगावकर म्हणाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat