जलयुक्त शिवारामधून झाले ग्राम परिवर्तन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : जलयुक्त शिवारामधून मोठया प्रमाणात ग्राम परिवर्तन झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केले. मुंबईतील महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. विशेष म्हणजे ज्यपालांनी पहिली काही मिनिटे मराठीत भाषण केले. यावेळी राज्यपालांनी सुरुवातील पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सरकारच्या योजनांची माहिती त्यांनी दिली.

 

"छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आणि यांसारख्या इतर अनेक थोर नेत्यांनी आणि समाजसुधारकांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांमुळे राज्याच्या जनतेची सेवा करण्यास शासनाला सतत प्रेरणा मिळते. महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास कटिबध्द आहे. दुग्धविकासात महाराष्ट्र राज्याची आघाडी आहे." असे राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सांगितले.

 

"मत्स्यव्यवसायात सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. त्याबरोबरच सरकारने सामाजिक न्यायाचा कार्यक्रम सक्षमपणे राबवला आहे. शासनाने रिक्त जागांची भरती केली. गृहनिर्माणच्या कामांतून गरीबांचा उद्धार केला. आरक्षणाची योग्य अंमलबाजावणी केली. तसेच राज्यात १०० टक्के विद्युतीकरणाचे ध्येय साध्य केले आहे." असेही ते पुढे म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@