१०वी, १२वी परीक्षार्थींना 'बेस्ट'चा सवलतीचा हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : गुरुवारपासून १२वीच्या परीक्षा चालू झाल्या आहेत. अशामध्ये विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून 'बेस्ट'ने १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्याचे जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत घर ते परीक्षा केंद्रापर्यंत प्रवास मोफत करता येणार आहे. याबाबत बेस्टने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

 

परीक्षा कालावधीमध्ये बसपासधारक विद्यार्थ्यांचे बसपास त्यांचे निवासस्थान आणि परीक्षा केंद्रादरम्यान वैध मानण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसचे वेगळे तिकीट घ्यावे लागणार नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे पास नसेल त्यांनी परीक्षा केंद्राच्या प्रवेशपत्रावरील शाळेचा शिक्का पाहून संबंधित विद्यार्थी महापालिका शाळेचा विद्यार्थी असल्याची खात्री करुन पूर्ण प्रवास भाडे न आकरता सवलतीच्या प्रवासभाड्यात प्रवास करु शकेल.

 

तसेच परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील प्रवेशद्वाराने गाडीत प्रवेश करण्याची मुभाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा कालवधी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी गर्दीच्या बस स्टॉपवर अधिकारी, पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास गैरसोय होणार नाही, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@