महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीर मरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2019
Total Views |
 
 

बुलढाणा : जम्मू काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यात जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी वाहन घुसवून घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटक हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. यात संजय भिकमसिंह राजपूत आणि नितीन शिवाजी राठोड यांचा सामावेश आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये राहणारे संजय भिकमसिंह राजपूत हे शहीद झाले आहेत. ते ४० वर्षांचे होते. शहरातील लखानी प्लॉट विवेकानंद आश्रम माता महाकाली नगरमध्ये ते राहत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर झालेल्या या हल्याच्या विरोधात सर्वत्र तीव्र भावना प्रकट होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

 

बुलडाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड यांना वीरमरण आले आहे. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण तसेच एक मुलगा आणि एक मुलगी असे कुटुंब आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@