नवी दिल्ली : जम्मू- काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात असणाऱ्या अवंतीपोरा भागात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या ४२ जवानांना वीरमरण आले. 'जैश-ए-मोहमम्द' या संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानकडून समर्थन मिळणाऱ्या या दहशतवादी कारवाईचा साऱ्या जगाने तीव्र शब्दांत निषेध केला. पण, खुद्द पाकिस्तानने मात्र हे आरोप आणि हा रोष परतवून लावला आहे.
सवयीप्रमाणे पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यातून स्वतःचे हात झटकले आहेत. या हल्ल्याबाबत चौकशी न करताच पाकिस्तानवर आरोप करणे तातडीने थांबवा असे म्हणण्यास सुरुवात केली आहे. 'जैश-ए-मोहम्मद' या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानतून कार्यरत असून त्याचा म्होरक्या मसूद अझर हा पाकिस्तानात मोकाट फिरत आहे. तरीही पाकिस्तानचे हे आरोप परतवून लावण्याची एकंदर भूमिका पाहता अनेकांना भुवया उंचावण्यास भाग पाडत आहे.
भारतात झालेला दहशतवादी हल्ला ही अत्यंत गंभीर बाब असून, या आरोपांशी काहीही पडताळणी न करता पाकिस्तानचे नाव जोडू नका असे म्हटले आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात हे विधान करण्यात आले आहे. पाकिस्ताननेही नेहमीच जगाच्या कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या हिंसक घटनांचा विरोध केला आहे ही बाब समोर आणत भारतीय माध्यमे आणि शासनाकडून लावण्यात येणारे आरोप त्यांनी फेटाळले आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/