नवी दिल्ली : आमच्या देशावर असे भ्याड हल्लेकरून आतंकवाद फैलावण्यात हल्लेखोर यशस्वी झाले असतील, असे त्यांना वाटत असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की, या हल्ल्याची मोठी किंमत मोजायला त्यांनी तयार व्हा, अशा शब्दात आतंकवादी हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला मोकाट सोडले जाणार नाही. देश एकजूट आहे, फक्त राजकारण करू नका आम्ही बदला घेणारच आहोत. सर्व सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. संपूर्ण देशभरात दहशतवादी हल्ल्याविरोधात तीव्र भावना व्यक्त केला जात आहेत. विरोधकांनी आमची आलोचना करावी आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो मात्र, या मुद्द्याचे राजकारण करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
दहशतवादाविरोधातील कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. पूर्वनियोजित कार्यक्रम वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat