सर्व विरोधी पक्ष, देश आणि सरकारसोबत : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2019
Total Views |
 
 

नवी दिल्ली : दहशतवाद आमच्यात फूट पाडू शकणार नाहीत. पुलवामा दहशतवादी हल्ला हा देशाच्या सुरक्षेवरील हल्ला आहे. दहशतवादी देशात अराजकता माजवू पाहत आहेत. पण दहशतवाद आम्हाला तोडू शकत नाहीत. अधिक ताकदीने आम्ही याविरोधात उभे राहुल आम्ही सर्व विरोधी पक्ष यावेळी जवान, देश आणि सरकारच्या पाठीशी आहोत, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.

 

आतंकवाद देशाच्या कोणत्याही ताकदीला तोडू शकणार नाही. आमचं हृदय हेलावलं आहे सर्व सुरक्षा दलांच्या परिवाराच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत. आतंकवाद्यांना सांगू इच्छितो कि, आमचे सुरक्षा जवान आणि सैनिक एकही घाव विसरणारे नाहीत. पुढील काही दिवस आमच्याकडून या प्रकरणी कोणतेही राजकीय वक्तव्य केले जाणार नसल्याचे सांगत आम्ही सरकारच्या पाठीशी उभे आहोत, असे ते म्हणाले.

 

देशाने गमावलेल्या त्या ४० जवानांच्या कुटुंबियांसह उभे राहण्याची ही वेळ असल्याचे मत माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेस नेते मनमोहन सिंह यांनी म्हटले. अशा भ्याड हल्ल्याविरोधात एकजूट होऊन लढण्याची ही वेळ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@