अझीम प्रेमजी यांना जीवनगौरव पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |


मुंबई : राष्ट्र ऊभारणीत उद्योग क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. यातूनच वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जग भारताकडे आकृष्ट होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.ईवायप्रस्तूतईवाय एन्टरप्र्येन्युअर्स ऑफ द इअर २०१८हे पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ उद्योजक विप्रो समुहाचे प्रमुख अझीम प्रेमजी यांना जीवन गौरव पुरस्कार तर आयशर मोटर्सचे सिद्धार्थ लाल यांना एन्टरप्र्येन्युअर्स ऑफ द इअर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 
 
 

कार्यक्रमात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीत खंबीर नेतृत्व म्हणून कामगिरी बजावत असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचेही उद्योजकांच्यावतीने उभे राहून, टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक राजीव मेहरोत्रा, उदय कोटक आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 

फडणवीस म्हणाले, “भारत हा वेगाने विकसित होणाऱ्या राष्ट्रांपैकी एक आहे. देशाची आर्थिक विकासाची वाटचालही गेल्या काही वर्षात वैशिष्ट्यपूर्ण अशीच राहिली आहे. त्यामुळे विकासाच्या वाटचालीबाबत जगाची भारतावर नजर आहे. या वाटचालीत उद्योजकांनीच आपल्या धडाडीने मोठे योगदान दिले आहे. भारताच्या आर्थिक विकासाची वाटचालीत गत चार वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली धाडशी निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामुळेही उद्योग क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. त्यातूनही मोठे परिवर्तन घडते आहे.

 
 
 

जीएसटी कर प्रणाली, दिवाळखोरीबाबतची संहिता अशा सुधारणावादी योजनांमुळे एकूणच अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणली गेली आहे.ईझ ऑफ डुइंग बिझनेस या धोरणामुळे जगभरातील ग्लोबल सप्लाय चेनचेही भारतीय उद्योग जगताकडे लक्ष लागून राहिले आहे,” असेही ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@