यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हळवणकर, प्रदेश सचिव संजय उपाध्याय व उमा खापरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये व प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. मा. पंकजा मुंडे म्हणाल्या की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात उज्वला योजना, सौभाग्य योजना, आयुष्यमान योजना,या सारख्या गरीब कल्याणाच्या विविध योजना जाहीर करून प्रत्यक्ष राबविल्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकांसाठी मोदी सरकारने काम केले आहे. मोदी सरकार केवळ घोषणा करून थांबले नाही, तर प्रत्यक्ष कामही सरकारने केले आहे. हे यशस्वी झालेले काम जनसामान्यांपर्यंत पोहोचायला हवे.
राज्यातील २५ लाख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज्यातील दोन कोटीहून अधिक घरांपर्यंत हा कार्यक्रम पोहचविला जाणार आहे. भाजपाचे कार्यकर्ते गेल्या पाच वर्षात भाजपा सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी असलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचून ‘मेरा परिवार भाजपा परिवार’चे स्टीकर दारावर लावणार असून घरावर भाजपाचा झेंडा लावणार आहेत. त्या व्यतिरिक्त भाजपाचे कार्यकर्ते आपल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून व दारावर ‘मेरा परिवार, भाजपा परिवार’चे स्टीकर लावून या अभियानात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. संजय उपाध्याय यांनी केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/