मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरावर ३६ गावांमध्ये सांस्कृतिक सभागृहांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची पूर्तता करण्यात आली आहे. प्रति सभागृह ६२ लक्ष ५३ हजार ४०० रुपये या प्रमाणे एकूण रूपये २२ कोटी ५१ लाख २२ हजार ४०० एवढ्या खर्चास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
सांस्कृतिक सभागृहे उभारण्यात येणाऱ्या ठिकाणांमध्ये वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार, धुळे जिल्ह्यातील वेहेरगांव फाटा व कुसुंबा, चंद्रपूर जिल्ह्यातील जुनासुर्ला व खेडी, अमरावती जिल्ह्यातील मादन, हिवरा व पुसदा, भंडारा जिल्ह्यातील चिचाळ, जैतपूर बारव्हा व सिलेगांव, सांगली जिल्ह्यातील आरेवाडी व वाळवा, बुलढाणा जिल्ह्यातील देवधाबा, हिंगोली जिल्ह्यातील कारवाडी, परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव बाळापूर, चिंचोली काळे, महातपूरी, झरी, कळगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील आसेगांव, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहगड नांद्रा, चोरखडी व यमगरवाडी, वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा, यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा, नांदेड जिल्ह्यातील माळेगाव, रिसनगाव, शेळगाव (छत्री), वझरगा, लातूर जिल्ह्यातील खारवाडी, हणमंत जवळगा, मादलापूर, अकोला जिल्ह्यातील पुनोती बु आणि वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव या गावांचा समावेश आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/