बेस्ट संपाच्या काळात विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष देत मुंबई विद्यापीठाने ही सूचना परिक्षा केंद्रांना दिली. महाविद्यालयांनाही मुंबई विद्यापीठाने ही सूचना दिली आहे. अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या वतीने जनसंपर्क प्रमुख विनोद मळाळे यांनी दिली. सध्या मुंबई विद्यापीठाच्या सकाळच्या सत्रात १७ परिक्षा सुरु आहेत. यामद्ये एलएलबी, एमएस्सी, एमकॉम, एमए, बीएड, एमपीएड, बीपीएड, (बीएड स्पेशल एज्युकेशन) एमएड या परिक्षांचा यात समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/