राम मंदिरासाठी आम्हीही अयोद्धेत जाऊ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019
Total Views |



मुंबई : "भारतातील ओबीसी, भटके-विमुक्त, बाराबलुतेदार समाज हेसुद्धा हिंदू धर्माचेच घटक आहेत. त्यामुळे राम हा आमच्यासुद्धा आस्थेचा विषय आहे. त्यामुळे सरकारने आमच्या भावनांचा आदर राखत राम मंदिर उभारणीचे काम हाती घ्यावे. अन्यथा, ओबीसी, भटके-विमुक्त, बाराबलुतेदार, आदिवासी, तसेच मागासवर्गीय समाज अयोध्येत जाईल." असा इशारा आमदार हरिभाऊ राठोड यांनी यावेळी दिला.

 

विद्यार्थी, नोकरदार, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, शेतकरी शेतमजूर, महिला बचत गट, विधवा, परितक्त्या, निराधार निराश्रित महिला हक्क आदी प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात विविध सामाजिक संघटनांतर्फे नुकतेच एकदिवसीय उपोषण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

 

आ. हरिभाऊ राठोड म्हणाले, “या कार्यक्रमाचे आयोजन विविध समाजातील संघटनांमार्फत असून यामध्ये विमुक्त घुमंतू बारा बलुतेदार, ओबीसी अतिपिछाडा सेवा संघ, बारा बलुतेदार महासंघ, राष्ट्रीय सत्यसोधक ओबीसी फेडरेशन, ऑल इंडिया बंजारा संघ, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल, ओबोसी, एस.सी, एस.टी, व्हीजेएनटी मागासवर्गीय विद्यार्थी आदी संघटना सहभागी झाल्या आहेत. राम हा आमच्याही आस्थेचा विषय आहे. त्यामुळे सरकारने राम मंदिर उभारणीचे काम हाती घ्यायला हवे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@